Friday, 30 April 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम जयंती निमित्र्य , राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन.

                         



  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम  जयंती निमित्र्य ,  राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन.  

                       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , ग्राम  जयंती निमित्र्य ,  राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान चे आयोजन , दि. 30 एप्रिल,२०२१ रोजी दुपारी 12:30वा. करण्यात आले होते ,  यासाठी या  व्याख्यानाचा आस्वाद घेण्याकरिता विनंती आयोजक श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी  सर्व  प्रशिक्षणार्थी , रासेयो स्वयंसेवक, सर्व निदेशक व कर्मचारी वर्ग यांना नम्र निवेदन केले होते. सध्या कोरोनाचा काळ लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन GOOGLE MEET च्या स्वरूपात करण्यात आले होते , करीता Join Meeting लिंक  :  meet.google.com/znm-osiv-fsq देण्यात आली होती. 

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती  यांच्या जयंती निमित्र्य राष्ट्रसंताचे परिवर्तनवादी विचार काळाची गरज  या विषयावर आभासी व्याख्यान आयोजन या विषयावर ,  आभासी व्याख्यानाचे आयोजन  दि. 30 एप्रिल,२०२१ रोजी दुपारी 12:30वा. करण्यात आले होते , या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक मध्ये कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेंन आर भांडे यांनी  कार्यक्रमाची रूपरेषा व मान्यवरांचे शब्ध सुमनांनी स्वागत केले , राष्ट्रसंतांनी आपल्या समग्र साहित्यामधून अतिशय पुरोगामी व परिवर्तनवादी विचार मांडले आहे  , राष्ट्रसंतांचे संपूर्णच विचार  विज्ञानवादी व पुरोगामी विचार असल्याने  सर्वांपर्यंत पोहचणीवे ,  आजची नितांत गरज असून त्यामुळेच समाजात परिवर्तन घडून येवू शकते. 

या वेळी प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. प्रमोदजी कोळमकर , जेष्ट निदेशक आय टी आय मोझरी यांनी सांगितले कि राष्ट्रसंतांच्या साहित्यामधे जागोजागी आपल्याला लोककल्याणकारी विचारांचा भरणा दिसून येतो.बहुजन समाज हा अंधश्रध्दा,कर्मकांड,यज्ञयाग,घातक रुढी परंपरा,अनिष्ट चालीरीती,बुवाबाजी यामधे फसलेला आहे याची महाराजांना जाणीव होती.यातून बहुजनांना बाहेर काढल्याशिवाय त्यांची प्रगती व विकास होणे कठीण आहे हे त्यांना ठाऊक होते.त्यामुळे त्यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून आपल्या साहित्याची निर्मिती केली.त्यांना आधुनिक विचारांचा आणि विज्ञानवादी विचार अंगिकारणारा माणूस हवा होता.म्हणून त्यांनी माणूस द्या मज माणूस द्या अशी आर्त हाक घातलेली आहे , असे मार्गदर्शन करताना श्री. प्रमोदजी कोळमकर  सर यांनी आपले मत  विषद केले.

या आभासी व्याख्यान मध्ये  यामध्ये  श्री. सुरेशजी कांडलकर सर , ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त शिल्प निदेशक यांनी अधिक माहिती ग्राम गीता विषयी  सांगीतले  कि ,   राष्ट्रसंतांनी ग्रामगीता नावाचा अनमोल ग्रंथ लिहिला व तो शेतक-यांंना अर्पण केला ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे.या ग्रंथामधे ४१ अध्याय असून ८ पंचके आहेत.हा ग्रंथ आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी संजीवनी आहे असे मत अनेक विचारवंतांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.त्यामुळे सरकारने या ग्रंथामधील पुरोगामी व समाजपयोगी विचारांचा उपयोग जर जनकल्याणाच्या कामासाठी केला तर निश्चितच देश महासत्ता बनू शकतो इतकी प्रचंड ताकद या ग्रंथामधे आहे.महाराजांनी खरी समाजसेवा कोणती आहे व कोणत्या विचारातून देशाची प्रगती होवू शकते याचे अतिशय योग्य मार्गदर्शन ग्रामगीतेत केले आहे.खरा संत कोणाला म्हणावे व संतांची जबाबदारी कोणती आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी हिंदी व मराठी या दोन्ही भाषेतून भजने व साहित्याची निर्मिती केली.८००० पेक्षा जास्त भजने त्यांनी हिंदी व मराठी भाषेतून लिहिली.त्यांची भजने अतिशय प्रभावी व लोकजागृती करणारी होती.लोकांवर त्यांच्या भजनाचा त्याकाळी प्रचंड प्रभाव होता आणि तो प्रभाव आजही कायम आहे , असे मत श्री. सुरेशजी कांडलकर सर यांनी व्यक्त केले. 

  तसेच या कार्यक्रमाला या संस्थेचे श्री. गजानन मानकर सर , शिल्प निदेशक यांनी  संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला. या आभासी कार्यक्रम मध्ये कु. अंकिता मनोहरे या प्रशिक्षणार्थी  हिने  राष्ट्र संतांच्या महान करायचा गौरव करून अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात जन्मलेल्या या संताचा लोकांवर त्याकाळी प्रचंड प्रभाव होता आणि आजही तो प्रभाव टिकून आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त संत नव्हते,तर एक कुशल संघटक व महान साहित्यीक होते असे आपले मनोगत विषद केले. 

आभासी व्याख्यान सरते शेवटी आयोजक श्री. सुरेन आर भांडे सर यांनी संपूर्ण उपस्थित मार्गदर्शक श्री. प्रमोदजी कोळमकर  सर ,  जेष्ट निदेशक आय टी आय मोझरी , श्री. सुरेशजी कांडलकर सर , ग्रामगीताचार्य तथा सेवानिवृत्त शिल्प निदेशक , श्री. गजानन मानकर सर , शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थी व सदर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी संस्थेचे प्र. प्राचार्य श्री. देशपांडे साहेब व गटनिदेशक श्री मंगेशजी राऊत सर यांचे सहकार्य लाभले त्याकरिता व  कार्यशाळेला लाभलेले मार्गदर्शक व प्रक्षिणार्थी यांचे  आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  

सदर कार्यशाळेला संपूर्ण संस्थेतील ४० ते ४५ मुले व मुली उपस्तित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे. 

विविध प्रसार माध्यमांनी घेतलेली दखल :-  

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी ता. तिवसा , जिल्हा अमरावती व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित

👉 IBN NEWS 7 खालील लिंक वर क्लिक करा 

👉 IBN NEWS 7



                     

                    









No comments:

Post a Comment

THANKS FOR VISITING THIS WWW.SKILLMOZARI.BLOGSPOT.COM AND MOTIVATE ME FOR FUTURE WORK , ANY OTHERS INFO. PLE SUGGEST WELCOME , VISIT AGAIN , THANKS